मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगातील वाहनांच्या धडकेत हा भीषण अपघात घडला. अपघात इतका गंभीर होता की बाप-लेकीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. फादर्स डेच्या दिवशीच घडलेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना मदत करण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र दोघांचेही प्राण वाचविणे शक्य झाले नाही.
या दुर्घटनेमुळे कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

