प्राध्यापकांना मारहाण, पदवी प्रमाणपत्र बोगस; शिक्षणमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश

Ratnagiri News
By -
0



गुहागरमधील एका महाविद्यालयात बनावट पदवी प्रमाणपत्रे वाटल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या घटनेत महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने तेथील प्राध्यापकांना मारहाण केल्यामुळे राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी तातडीने कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. 

आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत या विषयावर अर्धा तास चर्चा केली. चर्चेत, महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे बनावट प्रवेश, खोटी हजेरी आणि खोट्या परीक्षा दाखवून मुंबई विद्यापीठाकडून थेट तिसऱ्या वर्षाची पदवी प्रमाणपत्रे मिळवल्याचा आरोप केला. या गैरव्यवहारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा संशय आहे. या बेकायदेशीर कृत्यांना विरोध केल्यामुळे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने १८ डिसेंबर २०२४ रोजी तीन प्राध्यापकांना गंभीर मारहाण केली. या गंभीर घटनेची दखल घेत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!